करुणा व मैत्री सुत्त
पाली:
करणीय-मत्थ कुसलेन,
यन्तं सन्तं पदं अभिसमेच्च ।
सक्को उजू च सूजू च,
सुवचो चस्स मृदु अनतिमानी ।। १ ।।
सन्तुस्सको च सुभरो च,
अप्प किच्चो च सल्लहुकवृत्ति ।
सन्तिन्द्रियो च निपको चं,
अप्पगब्भो कुलेसु, अननुगिध्दो ।। २ ।।
न च खुद्दं समाचरे किञ्चि,
येन विञू परे उपवदेय्युं ।
सुखिनो वा खेमिनो होन्तु,
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।। ३ ।।
ये के चि पाणभूतत्थि तसा वा,
थावरा वा अनवसेसा ।
दीघा वा ये महन्ता वा।
मज्झिमा रस्सका अणुकथूला ।। ४ ।।
दिठ्ठा वा येव अदिठ्ठा,
ये च दूरे वसन्ति अविदूरे ।
भूता वा सब्भवेसी वा,
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।। ५ ।।
न परो परं निकुंब्बेथ ।
नतिमञ्ञेथ कत्थचि न किंञ्चि ।
व्यारोसना पटिघसञ्ञा,
नाञ्ञमञ्ञस्स दुक्खमिंच्छेय्य ।। ६ ।।
माता यथा नियं पुतं,
आयुसा एकपुत्तं मनुरक्खे ।
एवम्पि सब्ब-भुतेसु,
मानसंं भावये अपरिमाणं ।। ७ ।।
मेतञ्च सब्ब-लोकस्मिं,
मानसं भावये अपरिमाणं ।
उध्दं अधो च तिरियञ्च,
असम्बाधं अवेरं असपत्तं ।। ८ ।।
तिठ्ठं चरे निसिन्नो वा,
सयानो वा यावतस्स विगतमिध्दो ।
एतं सतिं अधिठ्ठेय्य,
ब्रम्हमें 'तं विहारं इदमा' हुं ।। ९ ।।
दिठ्ठिञ्च अनुपगब्भ,
सीलवा दस्सनेन सम्पन्नो ।
कामेसु विनेय्य गेधं,
न हि जातु गब्भसेय्यं पुनरेती’ति ।। १० ।।
मराठी:
शांती पदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याणसाधननिपुण मनुष्याने ही इच्छा करावी की, त्याने योग्य, सरळ,
अत्यंत सभ्य बनावे, त्याची वाणी मधुर असावी व तो कोमल आणि निराभिमानी असावा. ।। १ ।।
तो संतुष्ट असावा, प्रामाणिक उपायांनी जीवन जगणारा असावा.
तो उलाढाली करणारा नसावा आणि तो समाधानी, शांत-इंद्रिय,
प्रज्ञावान, गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा. ।। २ ।।
त्याचे हातून क्षुल्लकांत क्षुल्लक देखील असे कृत्य न घडो की, ज्या करिता सुज्ञ लोक त्याला दोष लावतील.
सर्व प्राणी सुखी, क्षमावान, आनंदी राहोत, ही भावना त्याने नेहमी बळगावी. ।। ३ ।।
भुचर अथवा जलचर, छोटे अथवा मोठे, मध्यम अथवा लहान, सुक्ष्म अथवा स्थूल
असे सर्व प्राणी सुखाने राहोत. दृश्य, अदृश्य, दूरस्थ अथवा जवळ, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होणारे,
जितके म्हणून प्राणी आहेत, ते सर्व प्राणीमात्र सुखाने राहोत. ।। ४ - ५ ।।
कोणीही दुसऱ्याला फसवू नये, कोणीही दुसऱ्याचा अपमान करु नये, शत्रुत्वाच्या
अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा न बाळगो की, दुसरे दुःखी होतील ।। ६ ।।
आपल्या प्राणाची पर्वा न करता, ज्याप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एका मुलाचे रक्षण करते,
त्याचप्रमाणे शांती पदाची इच्छा करणाऱ्या माणसाने प्राणीमात्रांबद्दल निस्सीम प्रेमभाव वाढवावा. ।। ७ ।।
वर , खाली आणि मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी प्राणीमात्रांबद्दल वैररहित आणि शत्रुत्व रहित मैत्री
भावना बाळगावी. ।। ८ ।।
उभे असता, चालले असता, बसले असता, झोपले असता जोपर्यंत जागे आहात,
तोपर्यंत ही मैत्री भावना कायम ठेवावी, यालाच ब्रह्मविहार म्हणतात. ।। ९ ।।
असा शीलवान व सम्यक दृष्टीसंपन्न मनुष्य कोणत्याही मोह जाळात न पडता, काम तृष्णेचा नाश करुन,
दुःखातून मुक्त होतो. ।। १० ।।
0 Comments